समजुतीच्या वाटेवरचा माझा प्रवास
नक्की कधीपासूनचा?
पण जाणिवेच्या लख्ख प्रदेशातलं
पहिलं गाव तर तुझंच...
आणि मग गावं बदलत गेली,
माणसं वाढत गेली.
प्रवास अजूनही चालूच!
आता जीव थकलाय
अन वाट सरता सरत नाहीये.....
-स्मिता.
khupach chan.............
जवाब देंहटाएं